Krushi Karj Mitra Yojana | कृषी कर्ज मित्र योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा
कृषी कर्ज मित्रयोजना संपूर्ण माहिती
शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाकरिता राष्ट्रीयकृत बँका तसेच सहकारी खाजगी बँका व पतपेढ्या मार्फत मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला जातो यामध्ये शेतकऱ्यांना कल हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जास्त होत असतो.
त्यामुळे सहकारी बँकेकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत कर्जाचे वितरण केले जाते तर सर्वसाधारण शेतकरी नवीन पीककर्ज मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेत असतो
तर हे कर्ज घेत असताना त्याला सातबारा उतारा पासून ते बँकांचे ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची गोळा करावी लागते.
त्यासाठी बराच कालावधी लागतो किंवा त्या संदर्भातील कागदपत्रे मिळत नसल्याने नाईलाजास्तव त्याला खासगी सावकाराकडून जास्तीच व्याज कर्ज घ्यावे लागते.
अशा शेतकऱ्यांना बँकेमार्फत कर्ज मिळवण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते तर त्यास विषय आज रोजी शासनाने 21 ऑक्टोबर 2019 रोजी एक महत्वाचा शासन निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
तर शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषिकर्ज मित्र योजना राबविण्यासाठी शासनाने मंजुरी यावेळी दिली आहे
याच योजने विषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांना या कृषिकर्ज मित्रांचं काय लागणार आहेत कृषी कर्ज मित्र शेतकऱ्यांना काय मदत करू शकता.
तसेच कृषी कर्ज मित्र योजना योजना काय आहेत (Krushi Karj Mitra Yojana) या योजनेचे उद्दिष्ट तसेच शेतकऱ्यांना कृषी कर्ज मित्र ही काय मदत करणार आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत
कृषी मित्र योजनांचे उद्दिष्ट
सदर कृषी मित्र योजनांचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना कृषी कर्जाच्या उपलब्ध सहजतेने विनाविलंब होण्यासाठी सहाय्य करणे व त्याद्वारे भांडवलाची गुंतवणूक वाढून कृषी क्षेत्राचा विकास साधने या योजनेचा मुख्य उद्देश आहे
योजनेचे स्वरूप काय आहे
कृषी क्षेत्रात भांडवलाचा ओघ व गुंतवणूक वाढून कृषी क्षेत्राच्या विकासात अधिकची भर पडणे आवश्यक आहे सूक्ष्म निरीक्षण
केल्यास तेच तेच लाभार्थी व या बाबीसाठी कर्ज घेत असल्याने दिसून येतात. त्यामुळे त्यांच्या शेती क्षेत्रात विकास झालेला
दिसून येतो त्या शेतकऱ्यांनी अतिरिक्त ज्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे परंतु कर्ज प्रक्रियेच्या अज्ञान असल्यास व वेळेच्या
अभावामुळे कर्ज मिळणे शक्य होत नाही. अशा इच्छुक पात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहजसुलभतेने त्यांच्या मागणीनुसार वेळेत
उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रशिक्षित स्वयंसेवक याची मदत साहाय्य देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषी कर्ज मित्र या
योजनेचा शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी लाभ होणार आहे तर या योजनेचे मुख्य स्वरूप अशाप्रकारे असणार आहे
कृषी मित्र यांना पैसे कसे मिळेल ?
अ)अल्प मुदतीचे कर्ज
1) प्रथम पिक कर्ज घेणारा शेतकरी प्रति प्रकरण सेवाशुल्क दीडशे रुपये
ब) मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज
नवीन कर्ज प्रकरण प्रति प्रकरण सेवाशुल्क अडीशे रुपये
खर्च प्रकरणाचे नूतनीकरण प्रति प्रकरण सेवा शुल्क दोनशे रुपये
कृषी कर्ज मित्र नोंदणी कशी करावी ?
कृषी मित्रांसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी
अ) कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी ( अद्याप कोणत्याही जिल्ह्याच्या संकेतस्थळावर नोंदणी साठी प्रकिया सुरू नाही.
ब) नोंदणी झालेल्या इच्छुक व्यक्तींची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल.
क) जिल्हा परिषदेकडील कृषी समितीस अंतिम निवडीचे अधिकार राहतील.
कर्ज मित्राचे काम काय ?
कृषी कर्ज मित्रांनी ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे त्यांना भेट देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपद्धतीची सविस्तर
माहिती द्यावी लागणार आहे. कृषिकर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्यांना संबंधी ने
कर्ज प्रकरण तयार करून मंजुरीसाठी बँकेमध्ये सादर करेल. कृषी कर्ज मित्र हा बँक व शेतकरी यांच्या मधील मध्यस्थीची
भूमिका ऐवजी सहाय्यक व सल्लागाराची भूमिका बजावणार आहे याठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे मित्रांनो जो कृषिकर्ज
मित्र आहे. हा फक्त भूमिकेत जाऊन मध्यस्थीची भूमिका नसून फक्त सहाय्यक व सल्लागाराची भूमिका बजावणार आहे
कृषिकर्ज मित्रांनी पारदर्शी व प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचाही व सल्ला देणे याविषयीची बंधपत्र देणे आवश्यक राहील.
कृषी कर्ज मित्र योजनाचा कालावधी ?
सदर योजनेचा कालावधी सन 2021 ते 2022 या आर्थिक वर्षामध्ये राहील आवश्यकतेनुसार योजनेचा कालावधी कमी करणे किंवा वाढविण्याचा अधिकार हा जिल्हा परिषदेला राहणार आहे.
📢 शासन निर्णय (GR) व शिफारस पत्र:- येथे पहा
📢 ठिंबक,तुषार सिंचन ९५% अनुदान:- येथे पहा