Mahadbt Shetkari Yojana Form : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अनुदान 10 पेक्षा जास्त योजना ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहे तरी कोणत्या योजना आहे.
100 टक्के अनुदान वरती या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे कागदपत्रे कोणती लागणार आहे. पात्रता काय ? संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घ्या हा संपूर्ण वाचा.
Mahadbt Shetkari Yojana Form
सिंचन विहीर अनुदान योजना :- या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-
रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप (रु.30 हजार), परसबाग (रु.500), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी 100% टक्के अनुदान फळबाग लागवड योजना सुरु झाली आहे. राज्यातील शेतकरी 100% टक्के अनुदान वर फळबाग लागवड करू शकतो संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरू करण्यात
आली आहे. या योजनेच्या मध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही. त्यांना हा लाभ देण्यात येणार आहे सदर योजनेचे शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे.
📑 हे पण वाचा :- चंद्रावर खड्डे कसे तयार झाले ? माहिती मराठी | चंद्रयान-3 चंद्राबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
Falbag Lagwad Yojana Online Form
सदर योजनामध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी 50% टक्के असेल दुसऱ्या वर्षी 30% टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20% टक्के. असे या ठिकाणी एकूण 100% टक्के अनुदान हे तीन वर्षात पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
यामध्ये दुसर्या व तिसर्या वर्षीच या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या आहे. झाडाची जीविताचे प्रमाण म्हणजेच 90% टक्के झाड बागायतीसाठी व कोरडवाहूसाठी 80% टक्के ठेवणे आवश्यक आहे.
तरच आपल्याला दुसरा आणि तिसरा टप्पा अनुदान दिले जाईल. सदर योजनेत भाग घेण्यासाठी शेतकरी कोकण विभागात कमीत कमी 10 गुंठे तर जास्तीत जास्त 10 हेक्टर पर्यंत योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
राज्यातील इतर विभागांमध्ये कमीत कमी 20 गुंठे तर जास्तीत जास्त 6 हेक्टर क्षेत्र मध्ये आपण फळबाग लागवड योजनेचा लाभ घेऊ शकतात. सदर योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक व महिला आणि दिव्यांग म्हणजेच अपंग शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे.
फळबाग लागवड योजना लाभ व अनुदान
तर सदर योजनेअंतर्गत अनुदान किती बाय किती तसेच 100% टक्के अनुदान कसे दिले जाईल. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुढे दिलेल्या पीडीएफ फाईल आपण ओपन करा आणि पहा कि आपल्याला कोणत्या पिकासाठी किती अनुदान दिलं जाईल. ऑनलाईन अर्ज कसा करावा ? दिलेला व्हिडिओ पहा
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ऑनलाईन फॉर्म
अंतर्गत लाभार्थ्यांना 100% टक्के अनुदान वरती कृषी विभागामार्फत अनुदान दिले जाणार आहे. या मध्ये कोणकोणते योजनेसाठी 100% टक्के अनुदान आहे. या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार),
इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा
तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप (रु.30 हजार), परसबाग (रु.500), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
नवीन विहीर योजना कागदपत्रे
- लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
- लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
- जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
- लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
- उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
- लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
- एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील ५ वर्षे त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देय नाही.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनांचे संपूर्ण ऑनलईन अर्ज कसा करावा:- येथे पहा