आजच्या या लेखामध्ये शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षासाठी तब्बल 12 हजार रुपये मिळणार आहे.
म्हणजेच 2 हजार रुपया ऐवजी आता 4 हजार रुपये मिळणार आहे. तर शासनाकडून शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे बातमी आहे. आणि आज झालेल्या या अर्थसंकल्पात हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
नेमकी आता कसा लाभ मिळणार आहे ?. आणि शासनाने हा निर्णय नेमकी कसा घेतला आहे ?, या संदर्भातील सविस्तर माहिती आणि त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना आणि कसा लाभ मिळेल याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
केंद्र सरकार प्रमाणेच आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासम्मान निधी योजना ही आणली आहे. आता केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकार सुद्धा 6 हजार रुपये वर्षाकाठी शेतकऱ्यांना देणार आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी तब्बल 12 हजार रुपये मिळतील. आणि अशी महत्वपूर्ण घोषणा देवेंद्रजी फडवणीस यांनी केलेले आहे. राज्याकडून नमो शेतकरी महासम्मान निधी योजना या अंतर्गत शेतकऱ्यांना आता लाभ मिळेल.
यावेळी देवेंद्र फडणीसांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहे. देवेंद्र फडवणीस म्हणाले की आज हवामानात बदल झाल्यामुळे अनेक समस्यांना अन्नदाता शेतकऱ्याला ग्रासले आहे.
Sbi बँक देणार शेळी, कुकुटपालन करिता कर्ज करा अर्ज
महासम्मान निधी योजना संपूर्ण माहिती
अशा स्थितीत सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, आणि कांदा उत्पादकांना आवश्यक ती मदत केली जाणार आहे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची उत्पन्न वाढीसाठी पंतप्रधानाच्या संकल्पनेतून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जाते.
त्याला जोडून आता राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाणार आहे. आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांनाही वार्षिक 6 हजार रुपये मिळतात.
Namo Shetkari MahaSamman Yojana
आता त्यात राज्य सरकारकडून आणखी 6000 रुपये मिळणार आहेत. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वार्षिक एकूण 12000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत अर्थसंकल्प 2023 मध्ये या योजनेची अंमलबजावणीची घोषणा केली आहे.
परंतु यावरती अजून कोणताही अधिकृत जीआर निर्गमित करण्यात आलेला नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य सरकारचाही या हातभार असणार आहे. केंद्राचे 6000 राज्याचे 6000 असे वार्षिक 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे
1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांना याला मिळणार आहे, अशा प्रकारची ही सर्वात महत्त्वाची निर्णय आज अर्थसंकल्पात घेण्यात आलेला आहे.
तुम्हाला कर्ज हवंय पण बँक कर्ज देत नाही या 25 बँक देतील कमी व्याजदरात कर्ज पहा बँक लिस्ट