Reti Dhoran Maharashtra Government :- राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरामध्ये रेती (वाळू) उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन रेती (वाळू) धोरण लागू करण्यात आले आहे. परंतु या रेती धोरणाचे अंमलबजावणी करण्यात आल्या नसल्यामुळे
राज्य शासनाच्या माध्यमातून स्वस्तात दिली जाणारे रेती कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री महसूल कार्यालयातील उपायुक्त, विभागीय आयुक्त, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या समवेत एक महत्त्वाची अशी बैठक पार पडली आहे.
Reti Dhoran Maharashtra Government
याच बैठकीमध्ये वाळू रेती धोरणाची अंमलबजावणी ही 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून राज्यामध्ये केली जाणार असल्याची माहिती विखे पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. याच्यासाठी नागरिकांना महाखनिज या मोबाईल ॲप्लिकेशन किंवा सेतू केंद्रावर
आपल्या आधार कार्ड नोंदणी करावी लागणार आहे. आणि आधार क्रमांक व नोंदणी सह नागरिकांना प्रति कुटुंब जास्तीत जास्त 50 मॅट्रिक टनापर्यंत ही रेती उपलब्ध करून दिली जाणार आहे.
येथे क्लिक करून एका कुटुंला किती मिळेल वाळू व काय दराने व कोणाला मिळेल मोफत वाळू लगेच पहा
रेती वाळू धोरण महाराष्ट्र 2023
यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वाळूच्या गाठ राखीव ठेवण्याच्या अधिकार देखील देण्यात आलेले आहेत. याप्रमाणे जे दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी आहे, तर अशा लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत घरकुलाची मंजुरी मिळालेली अशा घरकुलासाठी मोफत रेती स्वरूपामध्ये उपलब्ध केली जाणार आहे.
याच्या वाहतुकीचा खर्च फक्त त्या नागरिकांना त्या घरकुलाच्या लाभार्थ्याला करावा लागणार आहे. भरपूर लाभार्थ्यांच्या या भेटीसाठी वाळूघाट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे धोरण 1 वर्षासाठी लागू करण्यात आले आहेत.
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती